Skip to main content

७.आपले गाव आपले शहर



सांगा पाहू
(१) चित्रातील कोणत्या गोष्टी शेतात तयार होतात ?
( २) या गोष्टी आणखी कोठे मिळतात ?
(३) चित्रातील कोणती गोष्ट कारखान्यात तयार होते ? 
(
४) या गोष्टी तुम्हाला आणखी कोठे मिळतात ?
(५) या गोष्टीची आपल्याला कशासाठी आवश्यकता असते ?
(६) या गोष्टी ग्रामीण व शहरी भागांत पोहचवण्यासाठी कोणत्या माध्यमाचा वापर केला जातो ?
० धान्य, भाजीपाला, दूध इत्यादी माल गावातून येतो.
० सायकली, खेळणी, पुस्तके इत्यादी माल शहरातून येतो.
० शेतीची अवजारे, कापड, औषधे, पोटारी, साबण, काच, बल्ब इत्यादी वस्तूकारखान्यांत बनतात. कारखाने मुख्यत: शहराज़वळ असतात. गावात आणि शहरात राहणारे लोक या सर्व गोष्टी वापरतात. शहरी व ग्रामीण लोक आपल्या गरजा भागवण्यासाफी एकमेकांवर अवलंबून असतात.
० लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतुक्रीची व संदेशवहनाची साधने आवश्यक असतात. गाव आणि शहर यांच्यात पूर्वी मोठा फरक असे. आता हा फरक कमी होऊ लागला आहे.
शहरांमध्ये असणा-या अनेक सुविधा हळूहळू गावांमध्येही दिसू लागल्या आहेत.
० वाहतुकीची साधने
माणसाच्या गरजा वाढत गेल्या, तसा त्याने वाहतुकीच्या नवीन साधनांचा शोध लावला. आधी तो बैल, हत्ती, ऊंट, घोडा, गाढव अशा जनावरांवरून सामान वाहून नेत असे. पुढील काळात बैलगाडी, घोडागाडी अशी साधने आली. मग जहाजे, मोटारी व आगगाडी यांचा शोध लागला.पुढे विमानांचा शोध लागला. स्थामुळे वाहतूक जास्त वेगाने होऊ लागली. https://www.youtube.com/watch?v=mLg8SPCIWMg

[8/13, 9:25 AM] 
eschool4u.blogspot.in: सांगा पाहू.
पुढे एका रकान्यात वाहतुकीची साधने व दुस-या रकान्यात ती कशावरून जातात हे दिले आहे. त्यांच्या योग्य जोड्या रेषेने जुळवा.
आता बहुतेक गावांत आणि शहरांत वाहतुकीच्या सोई व सुविधा आल्या आहेत. आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात वाहतुकीच्या कोणत्या सोई अाहेत, कोणती प्रसिद्ध ठीकाणे आहेत ते समजून घेऊया. त्यासाठी तुमच्या जिल्ह्याचा नकाशा अभ्यासा. नकाशावरील कृती पूर्ण करा.
[8/13, 9:36 AM] 
eschool4u.blogspot.in: नकाशा शी मैत्री
(सांगली जिल्हा नकाशा) पान ४२
१. जिल्ह्यातील अभयारण्यांची नावे चौकटीत लिहा.
२.आपल्या जिल्ह्यातील मिरज़ है महत्त्वाचे जंक्शन आहे. कोणकोणते लोहमार्ग या ठिकाणी एकत्र येतात ते चौकटीत लिहा.
३ नकाशातील किल्ल्यांची ठीकाणे रंगवा व नावांना चौकटी करा
४. आपल्या जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या तालुक्यातून जातो ते चौकटीत लिहा.
[8/13, 9:51 AM] 
eschool4u.blogspot.in: सांगा पाहू
१.आजोबा काय वाचत अाहेत ? 
२. ताई माहिती मिळवण्यासाठी कशाचा वापर करत आहे ? 
३.आजी काय पाहत आहे 
४. दादा गाणी ऐकत आहे, त्यासाठी त्याने कानाला काय लावले आहे ?
५.बाबा बोलण्यासाठी कशाचा वापर करत अाहेत.
६. दारात कोण आले आहे? आईं त्यांच्याकडून काय घेत आहे ?
पत्र, संगणक, मोबाइल फोन, वर्तमानपत्र, टीव्ही, म्युझिक प्लेअर या गोष्टीचा वापर आपण करत असतो. ही सर्व साधने माहिती व निरोप मिळविण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी वापरली जातात. ही संदेशवहनाची साधने आहेत
० बोलीभाषा
माणूस हा एकमेकांशी भाषेच्या मदतीने बोलतो, अापले विचार दुस-यापर्यंत पोहचवतो. एकच भाषा वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या पद्धतीने बोलती जाते. प्रदेशांनुसार त्या भाषेतील शब्दांचे उच्चार बदलतात. तिच्यावर इतर भाषांचा प्रभाव पडतो. इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेत येतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रदेशांत एकाच भाषेच्या बोली तयार होतात. उदा. , अहिराणी, मालवणी, https://www.youtube.com/watch?v=WfFdPUwlLMY  व-हाडी या मराठी भाषेच्या काही बोली अाहेत. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे.
[8/13, 10:17 AM] 
eschool4u.blogspot.in: माहीत आहे का तुम्हाला
खूप पूर्वी संदेश पाठवायची प्रगत साधने नव्हती. त्या काळी वेगवेगळ्या पद्धतीनी माहिती पाठवली जायची. कधी कधी त्यासाठी शिकवलेल्या कबुतरांचा वापर केला जायजा. माहिती लिहिलेले कापड किंवा कागद कबुतरांच्या पायांना बांधून संदेश पाठवले जायचे. https://www.youtube.com/watch?v=a1tVvBxs4rk
काय करावे बरे? 
रोहन आणि रूपाली राहत असलेल्या भागामध्ये मोबाइल फोन, टेलिफोन, संगणक या सेवा उपलब्ध नाहीत. त्यांना परगावच्या नातेवाइकांना निरोप पाठवायचा आहे. तो निरोप पाठवण्यासाठी तुम्ही त्यांना कशी मदत कराल?
हे नेहमी लक्षात ठेवा
वाहतुकीच्या व संदेशवहनाच्या साधनांचा अलीकड़े मोठ्या प्रमाणात विकास झाला अाहे, परंतु या साधनांचा जास्त वापर केल्याने प्रदूषणातही वाढ झाली अाहे. त्यामुळे प्रत्येकाने या साधनांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे.
आपण काय शिकलो
१. गाव व शहर यांचा परस्परसंबंध.
२. वाहतुकींची व संदेशवहनाची साधने.
३. वाहतुकीच्या व संदेशवहनाच्या सोईची आवश्यकता
४. आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील वाहतुकींच्या सोई व प्रसिद्ध ठीकाणे.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? ...

९. पाणी नक्की येते कोठून

९. पाणी नक्की येते कोठून सांगा पाहू खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांची उत्तरे निवडा योग्य चित्राजवळ चौकटीत √ अशी खूण करा. चित्राशिवाय वेगळे उत्तर असल्यास रिकाम्या चौक्टीत लिहा.   ( १) तुम्ही प्राणी कशातून पिता ? ( २) हे पिण्याचे पाणी कशात साठवलेले होते ? ( ३) पिण्यासाठी साठवलेले हे पाणी कोठून आले असावे ? सांगा पाहू पण हे पाणी कुठून येत असावे ?   या प्रश्नाचे उत्तर आहे ' पाऊस '. आपल्याला सर्व पाणी पावसापासून मिळते. ० पाऊस पडल्यावर त्याचे काही पाणी जमिनीवरून वाहते. त्यामुळे ओहोळ , ओढे , नद्या तयार झाल्या आहेत. ० पावसाचे काही पाणी खोलगट भागात साचते. त्यापासून तलाव तयार झाले आहेत. ० नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते , त्याला धरण म्हणतात. पाऊस नसतो तेव्हा धरणाचे पाणी वापरता येते. ० पावसाचे काही पाणी जमिमीत मुरते. हे पाणी काढण्यासाठी विहीर खणली जाते. हातपंप किंवा कूपनलिका वापरूनही हे पाणी काढले जाते. ० ज़मिनीतील पाणी काही ठिकाणी झ-यांमधूनही बाहेर पडते. पाणी मिळण्याची काही ठिकाने निसर्गात आपोआप तयार होतात. धरण व विहीर यांसारखी ठिकाणे मात्र माणसाने ...

२. अबब! किती प्रकारचे हे प्राणी

चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील.त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ठ्यही सांगा. सांगा पाहू आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी , पाण्यात राहणारे प्राणी.   ० खूप मोठे प्राणी , अगदी चिटुकले प्राणी. ० आमचा संचार कुठे असतो ? गरुड़ आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात.   ० आमचे रग निरनिराळे बगळा पांढरा असतो. कावळा काळा असतो.म्हैसहि काळी असते.मोर तर रंगबेरंगी असतो. ० आम्ही आकाराने लहान-मोठे! घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात.   गांडूल आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. सांगा पाहू ० खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते ?   ० संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ? ० आमची हालचाल वेगवेगळी खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते. फांदीवरून तुरूतुरू पळते. हत्तीचे शरीर अवजड असते. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात. त्य...