Skip to main content

११. आपली हवेची गरज.



सांगा पाहू
० पुढील कोड़े तुम्ही नक्की सोडवू शकाल.
चोहीकडे पसरली आहे । तुमच्या अाजूबाजूला । । 
दिसत नाही डोळ्यांना । लागत नाही हाताला । । 
आहे तरी कोण मी ? येईल का ओळखायला ?
करून पहा.
फुगा फुगवला. फुगा का मोठा झाला ? फुग्यात तुम्ही काय भरता ?
हवा आपल्या अवतीभवती पसरली आहे. हवा अाहे हे आपल्याला जाणवते पण ती आपल्याला दिसत नाही. हवेला रंग, वास आणि चव नसते.
० नवा शब्द शिका !
श्वास : नाकाने आपण हवा आत घेतो. त्याला 'श्वास घेणे' म्हणतात.
उच्छवास : नाकाने हवा बाहेर टाकतो. त्याला 'उच्छ्वास सोडणे' म्हणतात.
श्वसन : श्वास आणि उच्छवास या दोन्हींचा मिळून श्वासोच्छवास होतो. आपण न थांबता सतत श्वासोच्छ्वास करत असतो. त्याला 'श्वसनअसे म्हणतात.

सांगा पाहू

शांत झोपलेल्या माणसाची छाती वर-खाली होताना का दिसते?

० आपण श्वासोच्छ्वास का करतो?

आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला हवेची गरज असते.

श्वास घेताना आपण हवा आत घेतो. हवेमुळे आपल्याला ताजेतवाने वाटते. शरीराची कामे व्यवस्थित होण्यासाठी आवश्यक तो जोम हवेमुळे मिलतो.

माणसाप्रमाणेच इतर सर्व सजीबांना हवेची गरज असते. बारकाईने निरीक्षण केले तर कुत्र्याची छाती बर-खाली होताना दिसते. त्यारून प्राणी श्वसन करतात हे आपल्याला कळते.

 माहीत आहे का तुम्हाला ?

० मासे पाण्यात राहतात. मग ते श्वासावाटे हवा आत कशी घेणार अशी शंका येते; पण मासे पाण्यात विरघळलेस्था हवेचा वापर करू शकतात.



काही लोक पाण्याने भरलेल्या काचेच्या पेटीत मासे पाळतात. पेटीतले मासे श्वासोच्छवास करत असतात. श्वासोच्छवासासाठी लागणारी हवा मासे पाण्यातून घेतात.

त्यामुळे पेटीतल्या पाण्यातील विरघळलेली हवा कमी होऊ शकते. हवा संपली तर मासे मरून जातील. म्हणून त्या पेटीतल्या पाण्यात सतत हवा सोडावी लागते.

अशा पेटीतल्या पाण्यातून एकसारखे बुडबुड़े येताना दिसतात ते त्यामुळेच.


करून पहा
० एका पेल्यात अर्ध्याहून अधिक स्वच्छ पाणी ध्या. 
० वर्तमानपत्राच्या कागदाचा एक छोटा तुकडा च्या.त्याची वीतभर लांबीची बारीक सुरळी बनवा. 
० या सुरळीचे एक टोक पेल्यातील पाण्यात बुडवा.
० दुस-या टोकाने पाण्यात फूंकर मारा. तुम्हाला काय आढळून येईल ?
० पेल्यातील पाण्यात बुडबुडे येतील. यातून काय उलगडते ?
० फुंकरीतून हवा पाण्यात शिरली. ती बुडबुड्याच्या रूपाने बाहेर पडली.
आपण काय शिकलो ? …
० हवा सर्वत्र असते.
०हवा डोळ्यांना दिसत नाही.
० हवेला रंग, वास आणि चव नसते.
सजीवांना श्वासोच्छवासासाढी हवेची गरज असते
है नेहमी लक्षात ठेवा
शुद्ध हवा मिळण्यासाठी दररोज पटांगणात खेळावे.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? ...

२४. आपले कपडे

वरील चित्रे का ळ जीपूर्वक पाहा. ही चित्रे कोणकोणत्या दिव सा तील आहेत ते चौकटींत लिहा.  पहिल्या चित्रात लोकांनी कशा प्रकारचे कपडे वापरले अहित ? त्यांनी असे कपडे वा परण्याचे कारण काय ? दुसऱ्या चि त्रात लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले दिसतात ? रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसांत करताना दिसत आहे त ? तुमच्या परिसरात वेगवेग ळ्या दिवसांत वापरल्या जाणा - या कप ड्यांची यादी करा. ० वेगवेग ळ्या दिवसांमध्ये कप ड्यांमध्ये असे बदल का झालेले आहेत? ० कारण त्या दिवसांमध्ये तिथल्या हवेत बदल झा लेले आहेत. ० या बदलांपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते. माहित आहे का तुम्हाला. {GIF} हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात.त्यांना ऋतू म्हणतात. ते ऋतू म्हणजे १)उन्हाळा २)पावसाळा ३) हिवाळा प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो. ऋतू एकामागून एक सतत येत असतात, याला ऋतुचक्र म्हणतात. ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात. हे नेहमी लक्षात ठेवा माणसा च्या व इतर सजी वां च्या जी व ना व र ऋतूंचा म...

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह...