Skip to main content

२४. आपले कपडे



वरील चित्रे काजीपूर्वक पाहा. ही चित्रे कोणकोणत्या दिवसातील आहेत ते चौकटींत लिहा. 
  1. पहिल्या चित्रात लोकांनी कशा प्रकारचे कपडे वापरले अहित ?
  2. त्यांनी असे कपडे वापरण्याचे कारण काय ?
  3. दुसऱ्या चित्रात लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले दिसतात ?
  4. रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसांत करताना दिसत आहेत ?
  5. तुमच्या परिसरात वेगवेगळ्या दिवसांत वापरल्या जाणा-या कपड्यांची यादी करा.
० वेगवेगळ्या दिवसांमध्ये कपड्यांमध्ये असे बदल का झालेले आहेत?
० कारण त्या दिवसांमध्ये तिथल्या हवेत बदल झालेले आहेत.
० या बदलांपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते.

माहित आहे का तुम्हाला.
{GIF}

हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात.त्यांना ऋतू म्हणतात.
ते ऋतू म्हणजे १)उन्हाळा २)पावसाळा ३) हिवाळा
प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो.
ऋतू एकामागून एक सतत येत असतात, याला ऋतुचक्र म्हणतात.
ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात.

हे नेहमी लक्षात ठेवा

माणसाच्या व इतर सजीवांच्या जीनाऋतूंचा मोठा परिणाम होतो. प्रत्येक ऋतूनुसार आपण वेगवेगळे कपडे घालतो आणि आहारात बदल करतो. शेती व इतर व्यवसायांवरही ऋतूंचा परिणाम होतो. निसर्गात ऋतूनुसार अनेक बदल होत असतात. माणसाने या बलांशी जुळवून घेणे चांगले.

जरा डोके चालवा

उन्हाळा , पावसाळा, हिवाळा हे ऋतू कोणकोणत्या महिण्यात येतात ?
हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपण उबदार कपडे घालतो. उन्हाळ्याअसे उबदार कपडे घातले, तर काय होईल?
प्राणी कपडे घालत नाहीत. मग थंडीपासून त्यांचे संरक्षण कसे होते?
हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गतात. या झाडांना पुन्हा पाने कधी येतात?

करून पहा.

आसपासच्या लोकांनी घातलेले कपडे पहा.
त्यांच्या कपड्यातील फरक खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा. (१) रंग (२)प्रकार (३) व्यवसायानुसार गणवेश.

कपड्यांची विविधता

आपला देश फार मोठा असल्यामुळे लोकांच्या कपड्यात प्रद्रेशांनुसार विविधता आढळते.
पुरुष शर्ट-पँट शिवाय धोतर-सदरा, पायजमा, तुंगी हे कपडे वापरताना दिसतात. तसेच टोपी, मुंडासे, फेटा, पगडी वापरतात.
pg140

स्त्रिया व मुली साडी, सलवार-कमीज, फ्रॉक व पँट-शर्ट सुद्धा वापरतात.

सण, उत्सव आणि समारंभात लोक नटूनथटून जातात. काही लोक पारंपरिक पोशाख घालतात. उठून दिसणारे भजरी कपडे घालतात. लोक वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या प्रकारांचे व वेगवेगळ्या नक्षीचे कपडे घालतात. तुमच्या लक्षात आले असेल. यालाच कपड्यातील विविधता म्हणतात. प्रामुख्याने ऋतूनृसार कोणते कपडे घालायचे ते ठरते, परंतु आवड, सोय व व्यवसाय यावरुही कोणते कपडे घालायचे हे ठरते. तसेच वेगवेगळ्या परंपरेनुसार सुद्धा कपड्यांमधील विविधता आढते.
तुम्ही शाळेत जाता तेव्हा गणवेश घालता. सगळ्या विद्याथ्योंनी एकाच प्रकारचा तो गणवेश घातल्यामुळे तुम्ही शाळेत एकसारखे दिसता. तुम्हाला एक वेगळी ओळख मिते. अशाच प्रकारे काही व्यसायांमध्ये गणवेश घातले जातात. अशा विविध व्यवसायांची माहिती घ्या.

मी कोण?
१.      पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो.
२.      मी निळे कपडे घालतो,आग लागली कि ती विझवतो.
३.      खाकी कपडे घालून भी तुम्हाला नेहमी दिसतो. भांडणतंटे आले, तर मी तिथे पोहचतो.
४.      भी रूग्णालयात असते आणि रुग्णांची काळजी घेते.
५.       मी देशाच्या संरक्षणास सदैव तत्पर असतो.

pg141

जरा डोके चालवा

१.      कमलला मामाकडे चालत जायचे आहे पण खूप पाऊस आला आहे. न भिजता मामाकडे जाण्यासाठी तिला काय करावे लागेल?

२.      जेकबने लोकरीचे कपडे घातले आहेत परंतु त्याला खुप गरम होत आहे. त्याने कोणते कपडे घालणे योग्य होईल?

काय करावे बरे
मनजित आणि मारिया यांची थंड हवेच्या ठिकाणी सहल जाणार आहे. तिथे वापरण्यासाठी त्यांनी खालीलपैर्की काय-काय सोबत घ्यावे असे तुम्हाला वाटते ? तुम्ही निवडलेल्या चित्रांखालील चौकटी      अशी खुण करा.
{IMAGE}

pg142

माहीत आहे का तुम्हाला?

सैनिकांचे गणवेश नैसर्गिक परिस्थितीशी मिलतेजुळते असतात. शत्रूच्या सैन्याला सहज़पणे लक्षात येऊ नये म्हणून अशी युक्ती केलेली असते. उदा. , वालवंटी प्रदेशात खाकी कपडे, जंगली प्रदेशात हिरवे, तर हिमालयासारख्या बर्फाळ प्रदेशात पांढरे कपडे वापरतात.

आपण काय शिकलो.

ऋतूमानानुसार कपड्यांमध्ये बदल करावे लागतात.
आवड, व्यवसाय परंपरेनुसारही कपड्यांमध्ये विविधता आढळते.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? ...

९. पाणी नक्की येते कोठून

९. पाणी नक्की येते कोठून सांगा पाहू खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांची उत्तरे निवडा योग्य चित्राजवळ चौकटीत √ अशी खूण करा. चित्राशिवाय वेगळे उत्तर असल्यास रिकाम्या चौक्टीत लिहा.   ( १) तुम्ही प्राणी कशातून पिता ? ( २) हे पिण्याचे पाणी कशात साठवलेले होते ? ( ३) पिण्यासाठी साठवलेले हे पाणी कोठून आले असावे ? सांगा पाहू पण हे पाणी कुठून येत असावे ?   या प्रश्नाचे उत्तर आहे ' पाऊस '. आपल्याला सर्व पाणी पावसापासून मिळते. ० पाऊस पडल्यावर त्याचे काही पाणी जमिनीवरून वाहते. त्यामुळे ओहोळ , ओढे , नद्या तयार झाल्या आहेत. ० पावसाचे काही पाणी खोलगट भागात साचते. त्यापासून तलाव तयार झाले आहेत. ० नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते , त्याला धरण म्हणतात. पाऊस नसतो तेव्हा धरणाचे पाणी वापरता येते. ० पावसाचे काही पाणी जमिमीत मुरते. हे पाणी काढण्यासाठी विहीर खणली जाते. हातपंप किंवा कूपनलिका वापरूनही हे पाणी काढले जाते. ० ज़मिनीतील पाणी काही ठिकाणी झ-यांमधूनही बाहेर पडते. पाणी मिळण्याची काही ठिकाने निसर्गात आपोआप तयार होतात. धरण व विहीर यांसारखी ठिकाणे मात्र माणसाने ...

२. अबब! किती प्रकारचे हे प्राणी

चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील.त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ठ्यही सांगा. सांगा पाहू आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी , पाण्यात राहणारे प्राणी.   ० खूप मोठे प्राणी , अगदी चिटुकले प्राणी. ० आमचा संचार कुठे असतो ? गरुड़ आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात.   ० आमचे रग निरनिराळे बगळा पांढरा असतो. कावळा काळा असतो.म्हैसहि काळी असते.मोर तर रंगबेरंगी असतो. ० आम्ही आकाराने लहान-मोठे! घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात.   गांडूल आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. सांगा पाहू ० खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते ?   ० संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ? ० आमची हालचाल वेगवेगळी खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते. फांदीवरून तुरूतुरू पळते. हत्तीचे शरीर अवजड असते. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात. त्य...