Skip to main content

23.वय जसजसे वाढते.



सांगा पाहू
० या चित्रातील मुलाच्या आईचा वेश कोणता आहे?
 ० ताईचा वेश कोणता आहे?
० आजोबांच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे?
बाबांच्या अंगात कोणत्या रंगाचा शर्ट आहे?
{IMAGE}
आई कोणती आणि ताई कोणती, हे तुम्ही कसे ओखलेत?
० आजोबा कोणते आणि बाबा कोणते, हे तुम्ही कसे ओळखलेत ?

सांगा पाहू

मोठ्या माणसांना विचारा आणि पुढील माहिती मिळवा?
 ० तान्हे बा मान कधी धरू लागते ?
० छोट्या बाळाला दात यायला कितव्या महिन्यात सुरुवात होते?
० छोटी बाळे पालथी पडायला कधी सुरुवात करता?
० छोटी बाळे उभी राहायला कधी शिकतात?
० अगदी तान्ह्या बाळांना भात का भरवत नाहीत?
तान्ह्या बाळांना कडेवर का घ्यावे लागते?

pg 134

बाळाची वाढ

घरात इवलेसे बा जन्माला येते. घरादाराला आनंद होतो. आई त्या छोट्याशा बाळाची मायेने काजी घेते. बाळाला रोज अंघो घालते. भू लागली के दूध पाजते.अंगाई गीत म्हणून झोपवते.बाळ हळूहळू वाढत असते. त्याची उंची वाढते. वनही वाढते.

बा मोठे होऊ लागते तसे ते रांगू लागते. बाळाला एक-एक करून दात येऊ लागतात. बाउभे राहायला शिकते. नंतर ते पावले टाकू लागते. अशी प्रगती होत असताना त्याची उंची आणि वजन वाढतच असते.

बा आधी आईला ओळखायला शिकते. मग ते रातील तरांना ओळखू लागते. दुधाबरोबर वेगळा आहार घेऊ लागते. आई दूधभात भरवू लागते.हळूहळू ते बोलायला शिकते. मुलगा असो वा मुलगी,वाढ होताना निसर्ग दोघामंध्ये काहीही भेदभाव कत नाही. आणखी मोठे झाले की, ते बा राहात नाही. छोट्या मुलाचा मोठा मुलगा होतो. छोट्या मुलीची मोठी मुलगी होते.
सहाव्या वर्षी मुले शाळेत जाऊ लागतात. वयाच्या अठराव्या र्षापर्यंत मुलांमुलींची उंची वाढत असते. साधारणपणे वयाच्या चाळीसाव्या र्षापर्यंत प्रकृती उत्तम राहाते. उंची वाढत नसली तरी वजन वाढत असते चांगल्या सवयी, चांगला आहार यांच्यामुळे प्रकृती उत्तम राहायला मदत मिते. नियमित व्यायाम केला तर त्याचा फायदा होतो.
चाळीशीनंतरही वयानुसार शरीरात बदल होत राहतात. हळूहळू डोळ्यांनी अस्पष्ट दिसू लागते.केस पांढरे होऊ लागतात. म्हातारपणी शरीराची ताकत आणखी कमी होऊ लागते. कानानी नीट ऐकू येईंनासे होते. स्मरणशक्ति कमी होते. दात पडू लागतात. झोप कमी होते. निरनिराळे आजार होऊ शकतात.

एके दिवशी मृत्यु येतो.

pg135

माहित आहे का तुम्हाला?

० बा मोठे झाल्यानंतर पुढे त्याला काही आजार होऊ शकतात. ते होऊ नयेत, म्हणून लसी देतात.
० कोणती लस कधी द्यायची ते रलेले असते प्रत्येक बालकाला लसी देणे गरजेचे आहे.

सांगा पाहू

एकाच आंब्याच्या झाडाची ही तीन चित्रे आहेत.सगळ्यात पूवींचे चित्र कोणते असेल? सगळ्यात अलीकडचे चित्र कोणते असेल ?
मधल्या काळातील चित्र कोणते असेल ? हे तुम्ही कसे ओळखले ?

नवा शब्द शिका
बीजांकुरण :  वनस्पतींच्या बियांना कोंब फुटतो. त्याला अंकुर म्हणतात. म्हणुन कोंब फुटण्याला बिजांकुरण असे म्हणतात.

० वनस्यर्तीची वाढ

काळानुसार जसे माणसांत बदल होतात, तसे ते वनस्पतींमध्येही होत असतात. बीजांकुरण आले की नवी वनस्पती निर्माण होते. तिची वाढ होण्यासाठी अंकुर मातीत रुजावा लागतो. मच अंकुरापासून तयार झालेले रोप जोम धरते मातीतले पाणी आणि काही पोषक पदार्थ रोपाला मितात पानांमध्ये अन्न तयार होऊ लागते. वनस्पती वाढू लागते. मग वनस्पतीला नवीन नवीन पाने फुटतात.वनस्पतीची उंचीही वाढू लागते.
योग्य वाढ झाली की वनस्पतीला फुले येऊ लागतात. फुलांपासून फळे तयार होतात. या बिया असतात. त्यांच्यापासून आणखी तशाच वनस्पती पुन्हा निर्माण होतात.
झाडांना सतत उन, वारा, पाऊस यांना तोंड द्यावे लागते. कधी कधी खोडावर कीड पडून ती वाढू लागते.त्यामुळे झाड आणखी दुबळे होते.शेवटी एखाद्या दिवशी खोड तुटते.
झाड खाली पडते. झाडाचा शेवट होतो.

सर्वच वनस्पतींचा शेवट होतो. पण त्याची कारणे वेगळी वेगळी असतात.
आपण काय शिकलो
  • बाळाच्या वाढीचे व प्रगतीचे काही ठरावीक टप्पे असतात.
  • वयाच्या अठराव्या वर्षापर्यं व्यक्तीची वाढ होत असते
  • वयाच्या चाळीशीनंतर व्यक्ती म्हातारपणाकडे झुकू लागते.
  • माणसाप्रमाणे वनस्पतींमध्येही वयानुरूप बदल होतात.
  • मातीत बीची टप्प्याटप्प्याने वाढ होते. बीजांकुरणापासून वनस्पर्तीच्या वाढीचे विविध टप्पे असतात. वनस्पतीचीही उंची व ताक वाढते.
  • माणूस असो किंवा वनस्पती, त्यांचा एखाद्या दिवशी शेवट होत असतो.

नेहमी लक्षात ठेवा

प्रकृती उत्तम ठेवण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य आहार महत्वाचे आहेत.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? ...

९. पाणी नक्की येते कोठून

९. पाणी नक्की येते कोठून सांगा पाहू खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांची उत्तरे निवडा योग्य चित्राजवळ चौकटीत √ अशी खूण करा. चित्राशिवाय वेगळे उत्तर असल्यास रिकाम्या चौक्टीत लिहा.   ( १) तुम्ही प्राणी कशातून पिता ? ( २) हे पिण्याचे पाणी कशात साठवलेले होते ? ( ३) पिण्यासाठी साठवलेले हे पाणी कोठून आले असावे ? सांगा पाहू पण हे पाणी कुठून येत असावे ?   या प्रश्नाचे उत्तर आहे ' पाऊस '. आपल्याला सर्व पाणी पावसापासून मिळते. ० पाऊस पडल्यावर त्याचे काही पाणी जमिनीवरून वाहते. त्यामुळे ओहोळ , ओढे , नद्या तयार झाल्या आहेत. ० पावसाचे काही पाणी खोलगट भागात साचते. त्यापासून तलाव तयार झाले आहेत. ० नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते , त्याला धरण म्हणतात. पाऊस नसतो तेव्हा धरणाचे पाणी वापरता येते. ० पावसाचे काही पाणी जमिमीत मुरते. हे पाणी काढण्यासाठी विहीर खणली जाते. हातपंप किंवा कूपनलिका वापरूनही हे पाणी काढले जाते. ० ज़मिनीतील पाणी काही ठिकाणी झ-यांमधूनही बाहेर पडते. पाणी मिळण्याची काही ठिकाने निसर्गात आपोआप तयार होतात. धरण व विहीर यांसारखी ठिकाणे मात्र माणसाने ...

२. अबब! किती प्रकारचे हे प्राणी

चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील.त्यांची नावे सांगा. प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ठ्यही सांगा. सांगा पाहू आमची नावे सांगा. आकाशात उडणारे प्राणी , पाण्यात राहणारे प्राणी.   ० खूप मोठे प्राणी , अगदी चिटुकले प्राणी. ० आमचा संचार कुठे असतो ? गरुड़ आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात.   ० आमचे रग निरनिराळे बगळा पांढरा असतो. कावळा काळा असतो.म्हैसहि काळी असते.मोर तर रंगबेरंगी असतो. ० आम्ही आकाराने लहान-मोठे! घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात.   गांडूल आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात. सांगा पाहू ० खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते ?   ० संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ? ० आमची हालचाल वेगवेगळी खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते. फांदीवरून तुरूतुरू पळते. हत्तीचे शरीर अवजड असते. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही. हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते. बेडकाचे मागचे पाय लांब असतात. त्य...