Skip to main content

२५ अवतीभोवती होणारे बदल



सांगा पाहू.
दिवसा आपल्याला परिसरातील गोष्टी स्पष्ट दिसतात. मग रात्री तशा का दिसत नाहीत?
दिवसा सूर्याचा प्रकाश मिलतो. त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसतात. सूर्य मावळला की अंधार पडतो. प्रकाश अपुरा असतो. रात्री आकाशात चांण्या दिसतात, पण आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत.

दिवस आणि रात्र यांचा सजीवावर परिणाम होतो.

सांगा पाहू.

निरीक्षण करून वर्णन करा.
सूर्य उगवण्यापूर्वी थोडा वे आकाशाच्या रंगांमध्ये कसकसे बदल होतात ?
सूर्य मावळल्यानंतर थोडा वेआकाशाच्या रंगांमध्ये कसकसे बदल होतात ?

सांगा पाहू.

सावली कशी दिसते ?
{IMAGE}

pg144
० सकाळी सूर्य उगवल्यानंतर सावली कोणत्या दिशेला दिसते ? ती लांब आहे की आखूड?
सूर्य डोक्यावर आला की सावलीत काय फरक होतो ?
संध्याकाळी सूर्य मावळायच्या आधी सावली कशी दिसते ?

० लांब साल्या, आखूड साल्या

सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो. सूर्य उगवण्यापूर्वी पूर्वेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात. सूर्य उगवला की सकाळी उन कोळे असते. साल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात.
सूर्य हळूहळू वर सरकू लागतो. साल्या आखुड होऊ लागतात. सूर्य डोक्यावर आला की साल्या खूंपच लहान होतात.

सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो. साल्या पूर्वेकडे सरकू लागतात आणि त्या लांब होऊ लागतात. सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात.

एरवी आकाश निळे दिसते.

माहित आहे का तुम्हाला?

निसर्ग जिथे सुंदर असेल तेथील सूर्यास्त पहायला लोक मुद्दाम जातात. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिदृध आहे. तिथल्या एका जागेला 'सूर्यास्त पहाण्याची जागा' असेच म्हणतात. तिथून सूर्यास्त फार अप्रतिम दिसतो.

महाबळेश्वरला गेलेले पर्यटक संध्याकाळी मुद्दाम त्या ठिकाणाला भेट देतात. नयनरम्य सूर्यास्ताचा अनुभव घेतात.

pg145
० पहाटेपासून रात्रीपर्यंत

रात्र संपत आल्याची चाहूपक्ष्यांना लागते. भल्या पहाटेपासू त्यांचा किलबिलाट सुरू होतो. जलपास कोंबडा असेल, तर त्याचे आरवणे ऐकू येते.
   पक्षी घरट्यातून बाहेर पड़तात. थव्याने उडू लागतात. त्यांचा अन्नाचा शोध सुरू होतो.

फुलझाडांवरच्या कळ्या हळूहळू उमलू लागतात. त्यांची फुले होतात. त्या फुलांमध्ये गोड मकरंद असतो. तो गोळा करण्यासाठी मधमाश्या येऊ लागतात. फुलपाखरे, मुंगे आणि इतर कीटक फुलांभोवती घिरट्या घालायला सुरुवात करतात.
 आपल्या परिसरातले लोक आपापल्या कामाला लागतात. आपणही कामे आवरून शाळेच्या यारीला लागतो.
{Image}

pg146

। नवा शब्द शिका !
रवंथ - काही प्राणी पोट भरेपर्यंत चरतात. नंतर पोटातील अन्न थोडे थोडे तोंडात आणून चघळतात. हे चघलेले अन्न पत गिताता त्याला रवंथ कणे म्हणतात. रवंथ केल्यामुळे या प्राण्यांनान्न नीट पचते. गाई, म्हशी रवंथ करणारे प्राणी आहेत.

निशाचर - काही प्राणी दिवसा विश्रांती घेतात. अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पड़ता अशा प्राण्यांना निशाचर म्हणतात.

{Image}
गाई, म्हशींना गुराखी चरायला घेऊन जातात. पोट भले की ही जनावरे निवांत ठिकाणी बसतात. रवंथ करू लागतात. सध्याका झाली की गाईगुरे गोठ्यात परततात. पक्ष्यांचे थवेही  घरट्याकडे निघतात. आपणही शाळेतून घरी परत येतो.

पण काही निशाचर सजीव मात्र सूर्य मावळल्यावरन्न शोधायला बाहेर पडतात. पतंग, रातकिडे आणि काजवे याचा अशा प्राण्यामध्ये समावेश होतो. वाघ, वटवाघू, घुबड हेही निशाचर प्राणी आहेत. रातराणी, निशिगंध अशी काही फुले रात्री उमलतात.
{IMAGE}

 pg147

करून पहा

जिथून आकाश स्पष्ट दिंसेल अशी पोकळी जागा शोधा.
एक आठवडा रोज संध्याकाळी ठरावीक वेळी तिथे जा.
चंद्र रोज एकाच ठिकाणी दिसतो का ?
चंद्राचा आकार रोज तसाच दिसतो का ?

चंद्राच्या कला

चंद्राची उगवण्याची वेररोज वेगवेगळी असते ठरावीक वेळी आकाशात चंद्र शोधला तर दररोज तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. चंद्राचा आकारही दररोज बदलतो.

{IMAGE}

ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. त्यानंतर पंधरा दिवस तो लहान लहान होत जातो. पंधराव्या दिवशी चंद्र डोळ्याना दिसत नाही. त्या दिवसाला अमावास्या म्हणतात.

अमावास्येच्या नंतर पंधरा दिवस चंद्राचा आकार मोठा मोठा होत जातो आणि पुढच्या पौर्णिमेला तो पुन्हा गोल गरगरीत दिसतो.
दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्या आकारांना चंद्राच्या 'कला' म्हणतात.

pg148
आपण काय शिकलो
१)      सूर्य उगवला की उजेड होतो, म्हणजेच दिवस होतो. सूर्य मावला की अंधार होतो म्हणजेच रात्र होते.
२)      सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकड़े मावतो.
३)      सकाळी सावल्या पश्चिमेकड़े पडतात आणि त्या लांब असतात. सूर्य डोक्यावर आला, की सावल्या खूपच लहान होतात. संध्याकाळी सावल्या पुन्हा लांब होतात आणि पूर्वेकडे पड़तात.
४)      दिवस आणि रात्र यांच्याशी सजीवांचे जीवन जोडलेले असते.
५)      चंद्राचा आकार आणि उगवण्याची वे रोज बदलते. चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात, त्यांना चंद्राच्या कला म्हणतात.
६)      ज्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो, त्या दिवशी पौर्णिमा असते. ज्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही, त्या दिवशी अमावस्या असते.

हे नेहमी लक्षात ठेवा

दिवस आणि रात्र यांच्या चक्राशी सर्व सजीव जोडलेले असतात. त्यामुळे ठरावीक वेळी ठरावीक कामे केली पाहिजेत.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? ...

९. पाणी नक्की येते कोठून

९. पाणी नक्की येते कोठून सांगा पाहू खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांची उत्तरे निवडा योग्य चित्राजवळ चौकटीत √ अशी खूण करा. चित्राशिवाय वेगळे उत्तर असल्यास रिकाम्या चौक्टीत लिहा.   ( १) तुम्ही प्राणी कशातून पिता ? ( २) हे पिण्याचे पाणी कशात साठवलेले होते ? ( ३) पिण्यासाठी साठवलेले हे पाणी कोठून आले असावे ? सांगा पाहू पण हे पाणी कुठून येत असावे ?   या प्रश्नाचे उत्तर आहे ' पाऊस '. आपल्याला सर्व पाणी पावसापासून मिळते. ० पाऊस पडल्यावर त्याचे काही पाणी जमिनीवरून वाहते. त्यामुळे ओहोळ , ओढे , नद्या तयार झाल्या आहेत. ० पावसाचे काही पाणी खोलगट भागात साचते. त्यापासून तलाव तयार झाले आहेत. ० नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते , त्याला धरण म्हणतात. पाऊस नसतो तेव्हा धरणाचे पाणी वापरता येते. ० पावसाचे काही पाणी जमिमीत मुरते. हे पाणी काढण्यासाठी विहीर खणली जाते. हातपंप किंवा कूपनलिका वापरूनही हे पाणी काढले जाते. ० ज़मिनीतील पाणी काही ठिकाणी झ-यांमधूनही बाहेर पडते. पाणी मिळण्याची काही ठिकाने निसर्गात आपोआप तयार होतात. धरण व विहीर यांसारखी ठिकाणे मात्र माणसाने ...

२४. आपले कपडे

वरील चित्रे का ळ जीपूर्वक पाहा. ही चित्रे कोणकोणत्या दिव सा तील आहेत ते चौकटींत लिहा.  पहिल्या चित्रात लोकांनी कशा प्रकारचे कपडे वापरले अहित ? त्यांनी असे कपडे वा परण्याचे कारण काय ? दुसऱ्या चि त्रात लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले दिसतात ? रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसांत करताना दिसत आहे त ? तुमच्या परिसरात वेगवेग ळ्या दिवसांत वापरल्या जाणा - या कप ड्यांची यादी करा. ० वेगवेग ळ्या दिवसांमध्ये कप ड्यांमध्ये असे बदल का झालेले आहेत? ० कारण त्या दिवसांमध्ये तिथल्या हवेत बदल झा लेले आहेत. ० या बदलांपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते. माहित आहे का तुम्हाला. {GIF} हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात.त्यांना ऋतू म्हणतात. ते ऋतू म्हणजे १)उन्हाळा २)पावसाळा ३) हिवाळा प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो. ऋतू एकामागून एक सतत येत असतात, याला ऋतुचक्र म्हणतात. ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात. हे नेहमी लक्षात ठेवा माणसा च्या व इतर सजी वां च्या जी व ना व र ऋतूंचा म...