Skip to main content

२. अबब! किती प्रकारचे हे प्राणी




चित्रांमधील प्राणी तुम्हाला नक्की ओळखू येतील.त्यांची नावे सांगा.
प्रत्येक प्राण्याचे वैशिष्ठ्यही सांगा.
सांगा पाहू
आमची नावे सांगा.
आकाशात उडणारे प्राणी, पाण्यात राहणारे प्राणी. 
० खूप मोठे प्राणी, अगदी चिटुकले प्राणी.
० आमचा संचार कुठे असतो ?
गरुड़ आकाशात उंच उडतो. गाय जमिनीवर चालते. मासे पाण्यात पोहतात. 
० आमचे रग निरनिराळे
बगळा पांढरा असतो. कावळा काळा असतो.म्हैसहि काळी असते.मोर तर रंगबेरंगी असतो.
० आम्ही आकाराने लहान-मोठे!
घोडा आणि बैल आकाराने मोठे असतात. शेळी आणि कुत्रा मध्यम असतात. उंदीर आणि खार लहान असतात. 
गांडूल आणि झुरळ त्याहूनही लहान असतात. चिलटे आणि मुंग्या अगदीच इटुकल्या असतात.
सांगा पाहू
० खूप वेगाने धावणारे प्राणी कोणते ? 
० संथ गतीने जाणारे प्राणी कोणते ?
० आमची हालचाल वेगवेगळी
खार आकाराने लहान असते शिवाय चपळही असते. झाडावर सुरसुर चढते. फांदीवरून तुरूतुरू पळते.
हत्तीचे शरीर अवजड असते. पाय जाडजूड असतात. हत्ती फार वेगाने धावू शकत नाही.
हरणाचे पाय बारीक असतात. ते वेगाने धावते.
बेडकाचे मागचे पाय लांब असतात. त्यामुळे दुणटुण उड्या मारत जाणे बेडकाला सहज जमते. 
सांगा पाहू.
० आपण गाई का पालतो? 
० आपल्या उपयोगी पडणारे प्राणी सांगा.
० घरात उंदीर आणि ढेकूण असतील, तर आपल्याला का आवडत नाही ?
० आम्ही उपयोगी !
आपण प्रेमाने प्राणी पाळतो
कुत्रा घराची राखण करतो. काही लोक आवडीने मांज़रेही पाळतात. गाई, म्हशी, शेळ्या दूध देतात.
काहीजण कोंबड्या पाळतात. मांस, दूध , अंडी मटण हे खाद्यपदार्थ प्राण्यांपासूनच मिळतात.
बैल शेतीच्या कामात मदत करतात.
गाडीला जुंपले तर बैल ओझेही वाहतात. ओझे वाहण्यासाठी काही-जण घोडे किंवा गाढवे पाळतात. ॰ आपण पाळलेल्या प्राण्याची निगा ठेवतो. ' त्यांना खाऊपिऊ घालतो. ते आजारी पडले तर त्यांची काळजी घेतो. पाळलेले प्राणी आपल्याला लळा लावतात
आम्ही घरघुशे!
काही प्राणी मात्र नको असले तरी घरात घुसतात. उंदीर आणि घुशी साठवणीतले धान्य फस्त करतात. शिवाय घरातील वस्तू कुरतडतात ते निरालेच !
घरात ढेकूण होतात. आपले रक्त शोषतात. कोळ्यांमुळे घरात जळमटे होतात.
डास, माश्या, चिलटे, झुरळे यांचाही आपल्याला त्रास होतो.
असे असले तरी त्रासदायक प्राण्यांनाही निसर्गात महत्त्व आहे.
भोवतालच्या प्राण्यांचे गट किती प्रकारे करता येतात ते आपण पाहिले ; पण है झाले वरवरच्या निरीक्षणातून पाडलेले गट.
वैज्ञानिक ज्या वेळी प्राण्यांचे गट पाडतात त्या वेळी ते यापेक्षा अधिक महत्त्वाच्या गोष्टीचा विचार करतात. कसा ते पाहूया
० आमची पिल्ले दूध पितात.
गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर या प्राण्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन मोठी होतात.
या 'प्राण्यांना चार पाय असतात. त्यांच्या अंगावर केस असतात. त्यांना बाह्यकर्ण असतात.
० आम्ही उडतो
पक्ष्यांना दोनच प्राय असतात. उडण्यासाठी दोन पंख असतात. पक्ष्यांच्या अंगावर पिसे असतात.
वेगवेगळ्या पक्ष्यांची उडण्याची ताकद वेगवेगळी असते. गरुड़ आकाशात उंच भरा-या घेऊ शकतो, उडाला की बराच काळ आकाशात फिरत राहू शकतो. याच्या उलट कोंबडा थोडासाच उंच उडतो. खालीही लगेच येतो.
० आम्ही पाण्यात राहतो.
निरनिराळ्या प्रकारचे मासे पाण्यात राहतात.
माशांना पर असतात. पर असल्यामुळेच त्यांना पाण्यात हालचाल करता येते. माशांच्या अंगावर खवले असतात.
माहीत आहे का तुम्हाला?
माशाला डोळ्यांच्या मागे कल्ले असतात. श्वास घेण्यासाठी माशांना कल्ल्यांचा उपयोग होतो.
० आम्ही सरपटतो.
सरडे, पाली आणि साप हे सरपटणारे प्राणी आहेत. सरपटणा-या प्राण्यांच्या अंगावर खवले असतात.
सरडे आणि पाली यांना चार प्राय असतात. ते खुपच आखूड असतात. 
सापाला तर पायच नसतात.
० आम्हाला कींटक म्हणतात.
फुलपाखरांनाही पंख असतात, पण आपण फुलपाखरांना पक्षी म्हणत नाही.ते कीटक अाहेत. फुलपाखरे पक्ष्यांपेक्षा अाकाराने लहान असतात. शिवाय त्यांना सहा पाय असतात.
सहा प्राय असणा-या ' प्राण्यांना कीटक म्हणतात. म्हणून फुलपाखरे कीटक आहेत.
डास, माश्या, झुरळे हेही कीटकच आहेत.
माहीत आहे का तुम्हाला ?
वटवाघळांना पंख असतात, पण त्यांच्या अंगावर पिसे नसतात. त्यांची पिल्ले आईचे दूध पिऊन वाढतात. ते कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा यांच्याप्रमाणे पक्षी नाहीत.
त्यांचा समावेश गाय, वाघ, हरीण आणि उंदीर यांच्या गटात होतो.
जरा डोके चालवा.
पुढीलपैको कोणत्या गटात घुबड, घोरपड आणि मांज़र या प्राण्यांचा समावेश कराल ?
गाय, कुत्रा, बोकड आणि उंदीर (आमची पिल्ले दूध पितात.) -----------------
कावळा, चिमणी, पोपट आणि कोंबडा (आम्ही उडतो.) -------------
सरडा, पाल आणि साप (आम्ही सरपटतो.) ------------------
ही झाली आपल्याला ठाऊक असणा-या थोड्याशा प्राण्यांची माहिती. पण आपल्या जगात कितीतरी प्राणी आहेत. 
प्राण्यांचे रंग, रूप, आकार यांमध्ये खूप वेगवेगळेपणा असतो. त्यांची हालचाल, राहण्याची जागा यांतही वेगवेगळेपणा असतो. प्राण्यांमधील या वेगवेगळेपणालाच प्राण्यांमधील विविधता म्हणतात.
समुद्रात राहणा-या प्राण्यांची संख्या  तर जमिनीवर राहणा-या प्राण्यांपेक्षा फार प्रचंड आहे. त्यांच्यात खूप विविधताही आहे. अशा सर्व प्राण्यांची माहिती अत्यंत मनोरंजक आहे. अजून थोडे मोठे झालात, की ती माहिती तुम्ही जरूर मिळवा.
आपण काय शिकलो ?
अवकाश, जमीन आणि पाणी या ठिकाणी वेगवेगळ्या प्राण्यांचा संचार असतो. 
रंग, आकार तसेच हालचाल करण्याच्या पद्धती अशा बाबतीत प्राण्यांमध्ये विविधता असते.
काही प्राण्यांचा आपल्याला उपयोग होतो. असे प्राणी आपण पाळतो.
काही प्राण्यांपासून आपल्याला त्रास होतो.
प्राण्यांची महत्त्वाची वैशिष्ट्ये बघून वैज्ञानिक त्यांचे गट करतात.
हे नेहमी लक्षात ठेवा
विविधता हा निसर्गाचा नियम आहे.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह

१. आपल्या अवतीभोवती

आपल्या अवतीभोवती आपल्या अवतीभोवती या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत. ते पदार्थ कोठे सापडतात ? या वस्तूंचे उपयोग सांगा. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात ? या वस्तूंचा उपयोग सांगा. अवतीभोवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत.त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो.त्यात माती दगड , धोंडे आहेत. नद्या नाले ताली आहेत.हवा आहे.डोंगर आणि टेकड्या आहेत.जंगले आहेत.शेते , घरे आणि रस्तेही आहेत.उजाड माळराने आहेत.वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात.निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष , झाडेझुडपे , वेली यांनी आपला परिसर सजला आहे.आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणी एक चिमणी यांची तुलना करू. दगड दगड जिथे आहे तिथेच पडून राहील.त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल.दगड जेवत नाही.त्यामुळे दगडाची वाढच होत नाही.दगडाला पिल्लेही होत नाहीत. चिमणी