Skip to main content

२५ अवतीभोवती होणारे बदल



सांगा पाहू.
दिवसा आपल्याला परिसरातील गोष्टी स्पष्ट दिसतात. मग रात्री तशा का दिसत नाहीत?
दिवसा सूर्याचा प्रकाश मिलतो. त्यामुळे आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसतात. सूर्य मावळला की अंधार पडतो. प्रकाश अपुरा असतो. रात्री आकाशात चांण्या दिसतात, पण आजूबाजूच्या गोष्टी स्पष्ट दिसत नाहीत.

दिवस आणि रात्र यांचा सजीवावर परिणाम होतो.

सांगा पाहू.

निरीक्षण करून वर्णन करा.
सूर्य उगवण्यापूर्वी थोडा वे आकाशाच्या रंगांमध्ये कसकसे बदल होतात ?
सूर्य मावळल्यानंतर थोडा वेआकाशाच्या रंगांमध्ये कसकसे बदल होतात ?

सांगा पाहू.

सावली कशी दिसते ?
{IMAGE}

pg144
० सकाळी सूर्य उगवल्यानंतर सावली कोणत्या दिशेला दिसते ? ती लांब आहे की आखूड?
सूर्य डोक्यावर आला की सावलीत काय फरक होतो ?
संध्याकाळी सूर्य मावळायच्या आधी सावली कशी दिसते ?

० लांब साल्या, आखूड साल्या

सूर्य सकाळी पूर्वेला उगवतो. सूर्य उगवण्यापूर्वी पूर्वेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात. सूर्य उगवला की सकाळी उन कोळे असते. साल्या पश्चिमेकडे पडतात आणि त्या लांब असतात.
सूर्य हळूहळू वर सरकू लागतो. साल्या आखुड होऊ लागतात. सूर्य डोक्यावर आला की साल्या खूंपच लहान होतात.

सूर्य हळूहळू पश्चिमेकडे सरकू लागतो. साल्या पूर्वेकडे सरकू लागतात आणि त्या लांब होऊ लागतात. सूर्य मावळल्यानंतर पश्चिमेकडे आकाशात विविध रंगांच्या छटा दिसतात.

एरवी आकाश निळे दिसते.

माहित आहे का तुम्हाला?

निसर्ग जिथे सुंदर असेल तेथील सूर्यास्त पहायला लोक मुद्दाम जातात. सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिदृध आहे. तिथल्या एका जागेला 'सूर्यास्त पहाण्याची जागा' असेच म्हणतात. तिथून सूर्यास्त फार अप्रतिम दिसतो.

महाबळेश्वरला गेलेले पर्यटक संध्याकाळी मुद्दाम त्या ठिकाणाला भेट देतात. नयनरम्य सूर्यास्ताचा अनुभव घेतात.

pg145
० पहाटेपासून रात्रीपर्यंत

रात्र संपत आल्याची चाहूपक्ष्यांना लागते. भल्या पहाटेपासू त्यांचा किलबिलाट सुरू होतो. जलपास कोंबडा असेल, तर त्याचे आरवणे ऐकू येते.
   पक्षी घरट्यातून बाहेर पड़तात. थव्याने उडू लागतात. त्यांचा अन्नाचा शोध सुरू होतो.

फुलझाडांवरच्या कळ्या हळूहळू उमलू लागतात. त्यांची फुले होतात. त्या फुलांमध्ये गोड मकरंद असतो. तो गोळा करण्यासाठी मधमाश्या येऊ लागतात. फुलपाखरे, मुंगे आणि इतर कीटक फुलांभोवती घिरट्या घालायला सुरुवात करतात.
 आपल्या परिसरातले लोक आपापल्या कामाला लागतात. आपणही कामे आवरून शाळेच्या यारीला लागतो.
{Image}

pg146

। नवा शब्द शिका !
रवंथ - काही प्राणी पोट भरेपर्यंत चरतात. नंतर पोटातील अन्न थोडे थोडे तोंडात आणून चघळतात. हे चघलेले अन्न पत गिताता त्याला रवंथ कणे म्हणतात. रवंथ केल्यामुळे या प्राण्यांनान्न नीट पचते. गाई, म्हशी रवंथ करणारे प्राणी आहेत.

निशाचर - काही प्राणी दिवसा विश्रांती घेतात. अन्न शोधण्यासाठी रात्री बाहेर पड़ता अशा प्राण्यांना निशाचर म्हणतात.

{Image}
गाई, म्हशींना गुराखी चरायला घेऊन जातात. पोट भले की ही जनावरे निवांत ठिकाणी बसतात. रवंथ करू लागतात. सध्याका झाली की गाईगुरे गोठ्यात परततात. पक्ष्यांचे थवेही  घरट्याकडे निघतात. आपणही शाळेतून घरी परत येतो.

पण काही निशाचर सजीव मात्र सूर्य मावळल्यावरन्न शोधायला बाहेर पडतात. पतंग, रातकिडे आणि काजवे याचा अशा प्राण्यामध्ये समावेश होतो. वाघ, वटवाघू, घुबड हेही निशाचर प्राणी आहेत. रातराणी, निशिगंध अशी काही फुले रात्री उमलतात.
{IMAGE}

 pg147

करून पहा

जिथून आकाश स्पष्ट दिंसेल अशी पोकळी जागा शोधा.
एक आठवडा रोज संध्याकाळी ठरावीक वेळी तिथे जा.
चंद्र रोज एकाच ठिकाणी दिसतो का ?
चंद्राचा आकार रोज तसाच दिसतो का ?

चंद्राच्या कला

चंद्राची उगवण्याची वेररोज वेगवेगळी असते ठरावीक वेळी आकाशात चंद्र शोधला तर दररोज तो वेगवेगळ्या ठिकाणी दिसतो. चंद्राचा आकारही दररोज बदलतो.

{IMAGE}

ज्या दिवशी चंद्र गोल गरगरीत दिसतो त्या दिवसाला पौर्णिमा म्हणतात. त्यानंतर पंधरा दिवस तो लहान लहान होत जातो. पंधराव्या दिवशी चंद्र डोळ्याना दिसत नाही. त्या दिवसाला अमावास्या म्हणतात.

अमावास्येच्या नंतर पंधरा दिवस चंद्राचा आकार मोठा मोठा होत जातो आणि पुढच्या पौर्णिमेला तो पुन्हा गोल गरगरीत दिसतो.
दररोज चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात त्या आकारांना चंद्राच्या 'कला' म्हणतात.

pg148
आपण काय शिकलो
१)      सूर्य उगवला की उजेड होतो, म्हणजेच दिवस होतो. सूर्य मावला की अंधार होतो म्हणजेच रात्र होते.
२)      सूर्य पूर्वेकडे उगवतो आणि पश्चिमेकड़े मावतो.
३)      सकाळी सावल्या पश्चिमेकड़े पडतात आणि त्या लांब असतात. सूर्य डोक्यावर आला, की सावल्या खूपच लहान होतात. संध्याकाळी सावल्या पुन्हा लांब होतात आणि पूर्वेकडे पड़तात.
४)      दिवस आणि रात्र यांच्याशी सजीवांचे जीवन जोडलेले असते.
५)      चंद्राचा आकार आणि उगवण्याची वे रोज बदलते. चंद्राचे जे निरनिराळे आकार दिसतात, त्यांना चंद्राच्या कला म्हणतात.
६)      ज्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो, त्या दिवशी पौर्णिमा असते. ज्या दिवशी चंद्र आकाशात दिसत नाही, त्या दिवशी अमावस्या असते.

हे नेहमी लक्षात ठेवा

दिवस आणि रात्र यांच्या चक्राशी सर्व सजीव जोडलेले असतात. त्यामुळे ठरावीक वेळी ठरावीक कामे केली पाहिजेत.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

१. आपल्या अवतीभोवती

आपल्या अवतीभोवती आपल्या अवतीभोवती या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत. ते पदार्थ कोठे सापडतात ? या वस्तूंचे उपयोग सांगा. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात ? या वस्तूंचा उपयोग सांगा. अवतीभोवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत.त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो.त्यात माती दगड , धोंडे आहेत. नद्या नाले ताली आहेत.हवा आहे.डोंगर आणि टेकड्या आहेत.जंगले आहेत.शेते , घरे आणि रस्तेही आहेत.उजाड माळराने आहेत.वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात.निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष , झाडेझुडपे , वेली यांनी आपला परिसर सजला आहे.आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणी एक चिमणी यांची तुलना करू. दगड दगड जिथे आहे तिथेच पडून राहील.त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल.दगड जेवत नाही.त्यामुळे दगडाची वाढच होत नाही.दगडाला पिल्लेही होत नाहीत. चिमणी

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह