Skip to main content

७.आपले गाव आपले शहर



सांगा पाहू
(१) चित्रातील कोणत्या गोष्टी शेतात तयार होतात ?
( २) या गोष्टी आणखी कोठे मिळतात ?
(३) चित्रातील कोणती गोष्ट कारखान्यात तयार होते ? 
(
४) या गोष्टी तुम्हाला आणखी कोठे मिळतात ?
(५) या गोष्टीची आपल्याला कशासाठी आवश्यकता असते ?
(६) या गोष्टी ग्रामीण व शहरी भागांत पोहचवण्यासाठी कोणत्या माध्यमाचा वापर केला जातो ?
० धान्य, भाजीपाला, दूध इत्यादी माल गावातून येतो.
० सायकली, खेळणी, पुस्तके इत्यादी माल शहरातून येतो.
० शेतीची अवजारे, कापड, औषधे, पोटारी, साबण, काच, बल्ब इत्यादी वस्तूकारखान्यांत बनतात. कारखाने मुख्यत: शहराज़वळ असतात. गावात आणि शहरात राहणारे लोक या सर्व गोष्टी वापरतात. शहरी व ग्रामीण लोक आपल्या गरजा भागवण्यासाफी एकमेकांवर अवलंबून असतात.
० लोकांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वाहतुक्रीची व संदेशवहनाची साधने आवश्यक असतात. गाव आणि शहर यांच्यात पूर्वी मोठा फरक असे. आता हा फरक कमी होऊ लागला आहे.
शहरांमध्ये असणा-या अनेक सुविधा हळूहळू गावांमध्येही दिसू लागल्या आहेत.
० वाहतुकीची साधने
माणसाच्या गरजा वाढत गेल्या, तसा त्याने वाहतुकीच्या नवीन साधनांचा शोध लावला. आधी तो बैल, हत्ती, ऊंट, घोडा, गाढव अशा जनावरांवरून सामान वाहून नेत असे. पुढील काळात बैलगाडी, घोडागाडी अशी साधने आली. मग जहाजे, मोटारी व आगगाडी यांचा शोध लागला.पुढे विमानांचा शोध लागला. स्थामुळे वाहतूक जास्त वेगाने होऊ लागली. https://www.youtube.com/watch?v=mLg8SPCIWMg

[8/13, 9:25 AM] 
eschool4u.blogspot.in: सांगा पाहू.
पुढे एका रकान्यात वाहतुकीची साधने व दुस-या रकान्यात ती कशावरून जातात हे दिले आहे. त्यांच्या योग्य जोड्या रेषेने जुळवा.
आता बहुतेक गावांत आणि शहरांत वाहतुकीच्या सोई व सुविधा आल्या आहेत. आपल्या तालुक्यात किंवा जिल्ह्यात वाहतुकीच्या कोणत्या सोई अाहेत, कोणती प्रसिद्ध ठीकाणे आहेत ते समजून घेऊया. त्यासाठी तुमच्या जिल्ह्याचा नकाशा अभ्यासा. नकाशावरील कृती पूर्ण करा.
[8/13, 9:36 AM] 
eschool4u.blogspot.in: नकाशा शी मैत्री
(सांगली जिल्हा नकाशा) पान ४२
१. जिल्ह्यातील अभयारण्यांची नावे चौकटीत लिहा.
२.आपल्या जिल्ह्यातील मिरज़ है महत्त्वाचे जंक्शन आहे. कोणकोणते लोहमार्ग या ठिकाणी एकत्र येतात ते चौकटीत लिहा.
३ नकाशातील किल्ल्यांची ठीकाणे रंगवा व नावांना चौकटी करा
४. आपल्या जिल्ह्यातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग कोणत्या तालुक्यातून जातो ते चौकटीत लिहा.
[8/13, 9:51 AM] 
eschool4u.blogspot.in: सांगा पाहू
१.आजोबा काय वाचत अाहेत ? 
२. ताई माहिती मिळवण्यासाठी कशाचा वापर करत आहे ? 
३.आजी काय पाहत आहे 
४. दादा गाणी ऐकत आहे, त्यासाठी त्याने कानाला काय लावले आहे ?
५.बाबा बोलण्यासाठी कशाचा वापर करत अाहेत.
६. दारात कोण आले आहे? आईं त्यांच्याकडून काय घेत आहे ?
पत्र, संगणक, मोबाइल फोन, वर्तमानपत्र, टीव्ही, म्युझिक प्लेअर या गोष्टीचा वापर आपण करत असतो. ही सर्व साधने माहिती व निरोप मिळविण्यासाठी किंवा पाठवण्यासाठी वापरली जातात. ही संदेशवहनाची साधने आहेत
० बोलीभाषा
माणूस हा एकमेकांशी भाषेच्या मदतीने बोलतो, अापले विचार दुस-यापर्यंत पोहचवतो. एकच भाषा वेगवेगळ्या प्रदेशांत वेगवेगळ्या पद्धतीने बोलती जाते. प्रदेशांनुसार त्या भाषेतील शब्दांचे उच्चार बदलतात. तिच्यावर इतर भाषांचा प्रभाव पडतो. इतर भाषेतील शब्द आपल्या भाषेत येतात. अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रदेशांत एकाच भाषेच्या बोली तयार होतात. उदा. , अहिराणी, मालवणी, https://www.youtube.com/watch?v=WfFdPUwlLMY  व-हाडी या मराठी भाषेच्या काही बोली अाहेत. मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा आहे.
[8/13, 10:17 AM] 
eschool4u.blogspot.in: माहीत आहे का तुम्हाला
खूप पूर्वी संदेश पाठवायची प्रगत साधने नव्हती. त्या काळी वेगवेगळ्या पद्धतीनी माहिती पाठवली जायची. कधी कधी त्यासाठी शिकवलेल्या कबुतरांचा वापर केला जायजा. माहिती लिहिलेले कापड किंवा कागद कबुतरांच्या पायांना बांधून संदेश पाठवले जायचे. https://www.youtube.com/watch?v=a1tVvBxs4rk
काय करावे बरे? 
रोहन आणि रूपाली राहत असलेल्या भागामध्ये मोबाइल फोन, टेलिफोन, संगणक या सेवा उपलब्ध नाहीत. त्यांना परगावच्या नातेवाइकांना निरोप पाठवायचा आहे. तो निरोप पाठवण्यासाठी तुम्ही त्यांना कशी मदत कराल?
हे नेहमी लक्षात ठेवा
वाहतुकीच्या व संदेशवहनाच्या साधनांचा अलीकड़े मोठ्या प्रमाणात विकास झाला अाहे, परंतु या साधनांचा जास्त वापर केल्याने प्रदूषणातही वाढ झाली अाहे. त्यामुळे प्रत्येकाने या साधनांचा वापर काळजीपूर्वक केला पाहिजे.
आपण काय शिकलो
१. गाव व शहर यांचा परस्परसंबंध.
२. वाहतुकींची व संदेशवहनाची साधने.
३. वाहतुकीच्या व संदेशवहनाच्या सोईची आवश्यकता
४. आपल्या जिल्ह्यातील, तालुक्यातील वाहतुकींच्या सोई व प्रसिद्ध ठीकाणे.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह

१. आपल्या अवतीभोवती

आपल्या अवतीभोवती आपल्या अवतीभोवती या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत. ते पदार्थ कोठे सापडतात ? या वस्तूंचे उपयोग सांगा. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात ? या वस्तूंचा उपयोग सांगा. अवतीभोवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत.त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो.त्यात माती दगड , धोंडे आहेत. नद्या नाले ताली आहेत.हवा आहे.डोंगर आणि टेकड्या आहेत.जंगले आहेत.शेते , घरे आणि रस्तेही आहेत.उजाड माळराने आहेत.वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात.निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष , झाडेझुडपे , वेली यांनी आपला परिसर सजला आहे.आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणी एक चिमणी यांची तुलना करू. दगड दगड जिथे आहे तिथेच पडून राहील.त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल.दगड जेवत नाही.त्यामुळे दगडाची वाढच होत नाही.दगडाला पिल्लेही होत नाहीत. चिमणी