Skip to main content

९. पाणी नक्की येते कोठून



९. पाणी नक्की येते कोठून
सांगा पाहू
खाली काही प्रश्न दिले आहेत. त्यांची उत्तरे निवडा योग्य चित्राजवळ चौकटीत अशी खूण करा. चित्राशिवाय वेगळे उत्तर असल्यास रिकाम्या चौक्टीत लिहा. 
(
१) तुम्ही प्राणी कशातून पिता ?
(२) हे पिण्याचे पाणी कशात साठवलेले होते ?
(३) पिण्यासाठी साठवलेले हे पाणी कोठून आले असावे ?
सांगा पाहू
पण हे पाणी कुठून येत असावे ? 
या प्रश्नाचे उत्तर आहे 'पाऊस'. आपल्याला सर्व पाणी पावसापासून मिळते.
० पाऊस पडल्यावर त्याचे काही पाणी जमिनीवरून वाहते. त्यामुळे ओहोळ, ओढे, नद्या तयार झाल्या आहेत.
० पावसाचे काही पाणी खोलगट भागात साचते. त्यापासून तलाव तयार झाले आहेत.
० नदीचे वाहणारे पाणी भिंत बांधून अडवले जाते, त्याला धरण म्हणतात. पाऊस नसतो तेव्हा धरणाचे पाणी वापरता येते.
० पावसाचे काही पाणी जमिमीत मुरते. हे पाणी काढण्यासाठी विहीर खणली जाते. हातपंप किंवा कूपनलिका वापरूनही हे पाणी काढले जाते.
० ज़मिनीतील पाणी काही ठिकाणी झ-यांमधूनही बाहेर पडते. पाणी मिळण्याची काही ठिकाने निसर्गात आपोआप तयार होतात. धरण व विहीर यांसारखी ठिकाणे मात्र माणसाने तयार केली आहेत. पाऊस कमी पडला, तर या ठिकाणांचे पाणी कमी होते. तुमच्या परिसरात, तालुक्यात किया जिल्ह्यात पाण्याची ठिकाणे तुम्ही पाहू शकता. सोबतचा जिल्हा
नकाशा 'अभ्यासा व त्यावरील कृती पूर्ण करा.
नदी कशी तयार होते व वाहते? . 
पावसाचे पाणी डोंगरासारख्या उंच  भागावरसुद्धा पडते.ते उताराच्या दिशेने वाहते
अशा पाण्यांचे असंख्य् ओहोळ एकत्र  येवून नदी तयार होते.
नदी, डोंगर द-या, पठार व मैदान यावरून वाहते.
जलरूपे : पाण्याचे प्रवाह व साठे ही जलरूपाची उदाहरणे आहेत.झरा ओढा,नदी, नाले, जलाशय, खाडी, समुद्र, .  महासागर ही काही ज़लरूपे अहित
भूरूपे : उंचवटा व खोलगटपणा यामुळे जमिनीला  वेगवेगळे आकार मिलतात. पर्वत, शिखर, डोंगर, टेकड्या, पठारे, मैदाने,खिंड,दरी ही काही भूरूपे आहेत.
माहीत आहे का तुम्हाला : झरा कोठून येतो 
पावसाचे पाणी जमिनीत मुरते. जमिनीवरील मातीच्या व दगडांच्या भेगांतून ते खोलबर झिरपते
० जमिमीखाली सुद्धा ते उंच भागाकडून कमी भागाकडे वाहते. हे जमिनीखालचे पाणी काही ठिकाणी जमिनीखालून बाहेर पडते. यालाच आपण 'झरा' म्हणतो.
करून पहा.
एकसारख्या आकारांच्या तीन बाटल्या घ्या. एक बाटली पाण्याने पूर्ण भरा. समजा, की हे सर्व पाणी वापरणारे तुम्ही एकटेच आहात. म्हणजे संपूर्ण बाटलीभर पाणी तुम्हाला वापरता येईल.
आता दुसरी बाटली भरा. असे समजा, कीं हे पाणी तुमच्यासह वर्गातील आणखी एक मुलगा वापरणार आहे. पाण्याचे समान दोन भाग करा. आता तुमच्या वाट्याला किती पाणी आले ते पाहा.
हे पाणी पहिल्या वेळेपेक्षा कमी होते की जास्त ते पहा.
आता तिसरी बाटली भरा. असे समजा, की हे पाणी तुमच्यासह वर्गातील चार मुले वापरणार आहेत. आता बाटलीतील गाण्याचे समान पाच भाग करावे लागतील. आता तुमच्या वाट्याला किती पाणी आले हे पाहा. या वेळी पहिल्या व दुसन-या वेळेपेक्षा पाणी जास्त आले की कमी ?
असे का झाले, याचा विचार करा.
काय करावे बरे     
राहुल आणि सगुणा खेळून अाल्यावर हातपाय धुतात, पाणी पितात, रोज सकाळी  अंघोल करतात, जेवण झाल्यावर ताट-वाटी धूतात.पण हे करत असताना खूप जास्त पाणी वापरतात. तेव्हा आईं त्यांना रागावते. त्यांना असा प्रश्न पडला की पाणी जपून कसे वापरावे.?
पाण्याचा जपून वापर करण्यासाठी कोणकोणत्या चांगल्या सवयी त्यांना सूचवाल?
नेहमी लक्षात ठेवा
  पावसाचे पाणी साठवले तर...
मौसिनराम व चेरापुंजी ही जगात सर्वात जास्त पाऊस पडणारी ठिकाणे अाहेत.ती भारतात अाहेत. उन्हाळ्यात मात्र तिथे पाण्याची कमतरता असते.आपल्या महाराष्ट्रातील कोकण भागातही असेच घडते. याचे कारण म्हणजे पाणी साठवण्याचे उपाय केले जात नाही. पावसाचे पाणी साठबले तर ही समस्या दूर होईल.
जरा डोके चालवा
१. पावसाचे पाणी साठवले तर ते नंतर वापरता येईल का ? पावसाचे पाणी तुम्ही कसे साठवाल ?
२. फक्त माणूस सर्व पाणी वापरू लागला, तर इतर सजीबांचे काय होईल ?
माहीत आहे का तुम्हाला ?
दूर अंतरावरच्या विहिरी, तलाब, पाण्याच्या टाक्या येथून पाणी घरापर्यंत आणण्यासाठी नळमार्गाचा वापर करतात.
पाणी काही ठिकाणी टॉंकरने अाणले जाते.
आपण काय शिकलो.
० आपल्याला मिळणारे सर्व पाणी पावसापासून मिळते. पावसामुळेच नदी, तलाव, झरे इत्यादी तयार होतात.
० नदीची सुरूवात डोंगरासारख्या उंच ठिकाणी होते व ती उताराकडे वाहते.
० पावसाचे पाणी साठवणे आवश्यक असते.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

१. आपल्या अवतीभोवती

आपल्या अवतीभोवती आपल्या अवतीभोवती या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत. ते पदार्थ कोठे सापडतात ? या वस्तूंचे उपयोग सांगा. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात ? या वस्तूंचा उपयोग सांगा. अवतीभोवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत.त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो.त्यात माती दगड , धोंडे आहेत. नद्या नाले ताली आहेत.हवा आहे.डोंगर आणि टेकड्या आहेत.जंगले आहेत.शेते , घरे आणि रस्तेही आहेत.उजाड माळराने आहेत.वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात.निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष , झाडेझुडपे , वेली यांनी आपला परिसर सजला आहे.आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणी एक चिमणी यांची तुलना करू. दगड दगड जिथे आहे तिथेच पडून राहील.त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल.दगड जेवत नाही.त्यामुळे दगडाची वाढच होत नाही.दगडाला पिल्लेही होत नाहीत. चिमणी

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह