Skip to main content

5.काळाची समज




काळाचे तीन भाग आहेत. जो घडून गेला जो भूतकाळ, जो चालू आहे तो वर्तमानकाळ आणि  जो येणार आहे तो भविष्यकाळ. आज सोमवार आहे. "आज" हा शब्द वर्तमानकाळ दाखवित. उद्या माझा वाढदिवस आहे. 'उद्या' "हा शब्द भविष्यकाळ दाखवितो.काल आजीने मला गोष्ट सांगितली. काल' हा शब्द भूतकाळ दाखवितो. काळ समजण्यासाठी दिनदर्शिका म्हणजेच कलेंडर, शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा उपयोग होतो.

  • दिनदर्शिकेचा उपयोग आपण कोणकोणत्या कामांसाठी करतो?
  • दिनदर्शिकेचे पान तुम्ही केंव्हा आणि का बदलता?
  • दिनदर्शिकेतील अंक काय सांगतात ?

माहीत आहे का तुम्हाला
इतिहास विषयाचा अभ्यास करताना ‘काळ’ समजून घेणे गरजेचे असते. एखाद्या ठिकाणी इमारतीचा पाया खोदातात्ना कांही वेळेस जुन्या मूर्ती , नाणी, खापराचे तुकडे इत्यादी वस्तू सापडतात.या वस्तू कोणत्या काळातील आहेत त्याचा अभ्यास केला जातो.अशा अभ्यासातून त्या वस्तूचा काळ समजतो.
जरा डोके चालवा.
आजचे वर्तमानपत्र दुस-या दिवशी जुने होते परंतु एखादी गोष्ट आठवली नाही तर आपण पुन्हा जुनी वर्तमानपत्रे शोधून त्यातून पाहीजे असलेली माहीती मिळवतो. म्हणजेच आज चे वर्तमानपत्र उद्या इतिहास सांगणारे महत्वाचे साधन बनणार असते.
pg30
सांगा पाहू
'काळ' मोजण्यासाठी कोणत्या साधनांचा अभ्यास करावा लागतो ?
काळ समजण्यासाठी आपण त्याचे विभाजन करताना सेकंद-मिनीट-तास, दिवस-रात्र, पंधरवडा, महिना, वर्ष अशा प्रकारे करतो. असा काळ आपणांस मोजता येतो. घटिकापात्र, घड्याळ, दिनदर्शिका ही काल मोजण्याची साधने आहेत.

माहीत आहे का तुम्हाला ?
चौदाव्या शतकात युरोपमध्ये वाळूच्या घड्याळाचा उपयोग होऊ लागला. यात एका लाकडी चौकटीत एकमेकांना जोडलेली काचेची दोन भांडी असत. त्या भांड्यांना एका भांड्यातील वाळू दुस-या भांड्यात जाऊ शकेल अशी छिद्रे असत. एका भांड्यात बारीक कोरडी वाळू घालून त्या भांड्याच्या छिद्रावाटे ती सर्व वाळू एक तासात खालच्या भांड्यात पडेल, अशी रचना केलेली असे. सर्व वाळू खालच्या भांड्यात पडल्याबरोवर लगेच घड्याळ उलटे केले जात असे. अशा त-हेने एक तासाचा कालखंड मोजण्यात येत असे. ही घड्याळे भारतातही वापरात होती. https://www.youtube.com/watch?v=TUnsp-YTOM4
करून पहा
भूतकाळातील आणि वर्तमानकाळातील छायाचित्र खाली दिलेल्या चौकटीत चिटकवा. भविष्यकाळाच्या चौकटीत तुम्ही २० वर्षानंतर कसे असाल, याचे कल्पनाचित्र काढा.

सांगा पाहू
आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने का पाडतो ? व्यवहाराच्या सोईंसाठी आपण काळाचे भाग वेगवेगळ्या पद्धतीने पाडत असतो. उदा. , आता, थोड्या वेळापूर्वी, थोड्या वेळानंतर किंवा आज, काल, उद्या या शब्दांचा उपयोग करताना आपण नकळत मनातल्या मनात काळ मोजत असतो.
आपण काय शिकलो
व्यवहाराच्या सोईंसाठी आपण काळाचे भाग पाडतो. आता, थोड्या वेळापूर्वी किंवा नंतर, असे शब्द वापरताना आपण नकळत काळ मोजत असतो.
काळ समजण्यासाठी घड्याळ, दिनदर्शिका, शाळेचे वेळापत्रक इत्यादी साधनांचा उपयोग होतो.
काळाचे विभाजन करताना सेकंद-मिनिट-तास, दिवस-रात्र, आठवडा, पंधरवडा, महिना, वर्ष असे भाग करतात.
जुन्या वस्तू किंवा इमारती, नाणी, मूर्ती, खापराचे तुकडे किंवा परिसरातील ऐतिहासिक वास्तु-मुळे काळाची समज येते. गावाचा/परिसराचा इतिहास समजण्यास मदत होते

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत? ...

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह...

२४. आपले कपडे

वरील चित्रे का ळ जीपूर्वक पाहा. ही चित्रे कोणकोणत्या दिव सा तील आहेत ते चौकटींत लिहा.  पहिल्या चित्रात लोकांनी कशा प्रकारचे कपडे वापरले अहित ? त्यांनी असे कपडे वा परण्याचे कारण काय ? दुसऱ्या चि त्रात लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले दिसतात ? रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसांत करताना दिसत आहे त ? तुमच्या परिसरात वेगवेग ळ्या दिवसांत वापरल्या जाणा - या कप ड्यांची यादी करा. ० वेगवेग ळ्या दिवसांमध्ये कप ड्यांमध्ये असे बदल का झालेले आहेत? ० कारण त्या दिवसांमध्ये तिथल्या हवेत बदल झा लेले आहेत. ० या बदलांपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते. माहित आहे का तुम्हाला. {GIF} हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात.त्यांना ऋतू म्हणतात. ते ऋतू म्हणजे १)उन्हाळा २)पावसाळा ३) हिवाळा प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो. ऋतू एकामागून एक सतत येत असतात, याला ऋतुचक्र म्हणतात. ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात. हे नेहमी लक्षात ठेवा माणसा च्या व इतर सजी वां च्या जी व ना व र ऋतूंचा म...