Skip to main content

२४. आपले कपडे



वरील चित्रे काजीपूर्वक पाहा. ही चित्रे कोणकोणत्या दिवसातील आहेत ते चौकटींत लिहा. 
  1. पहिल्या चित्रात लोकांनी कशा प्रकारचे कपडे वापरले अहित ?
  2. त्यांनी असे कपडे वापरण्याचे कारण काय ?
  3. दुसऱ्या चित्रात लोकांनी कोणत्या प्रकारचे कपडे घातलेले दिसतात ?
  4. रेनकोट व छत्रीचा वापर लोक कोणत्या दिवसांत करताना दिसत आहेत ?
  5. तुमच्या परिसरात वेगवेगळ्या दिवसांत वापरल्या जाणा-या कपड्यांची यादी करा.
० वेगवेगळ्या दिवसांमध्ये कपड्यांमध्ये असे बदल का झालेले आहेत?
० कारण त्या दिवसांमध्ये तिथल्या हवेत बदल झालेले आहेत.
० या बदलांपासून शरीराचे संरक्षण होण्यासाठी आपल्याला कपड्यांची गरज असते.

माहित आहे का तुम्हाला.
{GIF}

हवेतील अशा बदलामुळे वर्षाचे तीन मुख्य भाग पडतात.त्यांना ऋतू म्हणतात.
ते ऋतू म्हणजे १)उन्हाळा २)पावसाळा ३) हिवाळा
प्रत्येक ऋतू साधारणपणे चार महिन्यांचा असतो.
ऋतू एकामागून एक सतत येत असतात, याला ऋतुचक्र म्हणतात.
ऋतूनुसार निसर्गात व परिसरात बदल होतात.

हे नेहमी लक्षात ठेवा

माणसाच्या व इतर सजीवांच्या जीनाऋतूंचा मोठा परिणाम होतो. प्रत्येक ऋतूनुसार आपण वेगवेगळे कपडे घालतो आणि आहारात बदल करतो. शेती व इतर व्यवसायांवरही ऋतूंचा परिणाम होतो. निसर्गात ऋतूनुसार अनेक बदल होत असतात. माणसाने या बलांशी जुळवून घेणे चांगले.

जरा डोके चालवा

उन्हाळा , पावसाळा, हिवाळा हे ऋतू कोणकोणत्या महिण्यात येतात ?
हिवाळ्यात थंडीपासून संरक्षण व्हावे म्हणून आपण उबदार कपडे घालतो. उन्हाळ्याअसे उबदार कपडे घातले, तर काय होईल?
प्राणी कपडे घालत नाहीत. मग थंडीपासून त्यांचे संरक्षण कसे होते?
हिवाळ्यात अनेक झाडांची पाने गतात. या झाडांना पुन्हा पाने कधी येतात?

करून पहा.

आसपासच्या लोकांनी घातलेले कपडे पहा.
त्यांच्या कपड्यातील फरक खालील मुद्द्यांच्या आधारे लिहा. (१) रंग (२)प्रकार (३) व्यवसायानुसार गणवेश.

कपड्यांची विविधता

आपला देश फार मोठा असल्यामुळे लोकांच्या कपड्यात प्रद्रेशांनुसार विविधता आढळते.
पुरुष शर्ट-पँट शिवाय धोतर-सदरा, पायजमा, तुंगी हे कपडे वापरताना दिसतात. तसेच टोपी, मुंडासे, फेटा, पगडी वापरतात.
pg140

स्त्रिया व मुली साडी, सलवार-कमीज, फ्रॉक व पँट-शर्ट सुद्धा वापरतात.

सण, उत्सव आणि समारंभात लोक नटूनथटून जातात. काही लोक पारंपरिक पोशाख घालतात. उठून दिसणारे भजरी कपडे घालतात. लोक वेगवेगळ्या रंगांचे, वेगवेगळ्या प्रकारांचे व वेगवेगळ्या नक्षीचे कपडे घालतात. तुमच्या लक्षात आले असेल. यालाच कपड्यातील विविधता म्हणतात. प्रामुख्याने ऋतूनृसार कोणते कपडे घालायचे ते ठरते, परंतु आवड, सोय व व्यवसाय यावरुही कोणते कपडे घालायचे हे ठरते. तसेच वेगवेगळ्या परंपरेनुसार सुद्धा कपड्यांमधील विविधता आढते.
तुम्ही शाळेत जाता तेव्हा गणवेश घालता. सगळ्या विद्याथ्योंनी एकाच प्रकारचा तो गणवेश घातल्यामुळे तुम्ही शाळेत एकसारखे दिसता. तुम्हाला एक वेगळी ओळख मिते. अशाच प्रकारे काही व्यसायांमध्ये गणवेश घातले जातात. अशा विविध व्यवसायांची माहिती घ्या.

मी कोण?
१.      पांढरा कोट घालून मी लोकांना तपासतो.
२.      मी निळे कपडे घालतो,आग लागली कि ती विझवतो.
३.      खाकी कपडे घालून भी तुम्हाला नेहमी दिसतो. भांडणतंटे आले, तर मी तिथे पोहचतो.
४.      भी रूग्णालयात असते आणि रुग्णांची काळजी घेते.
५.       मी देशाच्या संरक्षणास सदैव तत्पर असतो.

pg141

जरा डोके चालवा

१.      कमलला मामाकडे चालत जायचे आहे पण खूप पाऊस आला आहे. न भिजता मामाकडे जाण्यासाठी तिला काय करावे लागेल?

२.      जेकबने लोकरीचे कपडे घातले आहेत परंतु त्याला खुप गरम होत आहे. त्याने कोणते कपडे घालणे योग्य होईल?

काय करावे बरे
मनजित आणि मारिया यांची थंड हवेच्या ठिकाणी सहल जाणार आहे. तिथे वापरण्यासाठी त्यांनी खालीलपैर्की काय-काय सोबत घ्यावे असे तुम्हाला वाटते ? तुम्ही निवडलेल्या चित्रांखालील चौकटी      अशी खुण करा.
{IMAGE}

pg142

माहीत आहे का तुम्हाला?

सैनिकांचे गणवेश नैसर्गिक परिस्थितीशी मिलतेजुळते असतात. शत्रूच्या सैन्याला सहज़पणे लक्षात येऊ नये म्हणून अशी युक्ती केलेली असते. उदा. , वालवंटी प्रदेशात खाकी कपडे, जंगली प्रदेशात हिरवे, तर हिमालयासारख्या बर्फाळ प्रदेशात पांढरे कपडे वापरतात.

आपण काय शिकलो.

ऋतूमानानुसार कपड्यांमध्ये बदल करावे लागतात.
आवड, व्यवसाय परंपरेनुसारही कपड्यांमध्ये विविधता आढळते.

Comments

Popular posts from this blog

६. आपल्या गावाची ओळख

दिलेल्या शब्दकोड्यातून गावाची नावे शोधा " गाव कसे तयार होते ? खूप प्राचीन काली शेतीचा शोध लागण्यापूवीं माणूस भटके जीवन जगत होता.त्या काळी तो जगण्यासाठी शिकार व कंदमुळे यावर अवलंबून होता. पुढे शेतीचा शोध लागला. जमीन आणि प्राणी याच्या आधारे तो वस्ती करू लागला. पुढे माणसे एकाच ठिकाणी घरे बांधून राहू लागली एकमेकांच्या सहकार्याने शेती करू लागली. त्यांची घरे एकमेकांच्या जवळजवळ असत. त्यातून वस्ती तयार झाली. त्यांचा विस्तार झाला. अनेक वस्त्यांचे मिळून ' गाव ' तयार झाले. त्यांच्यात सुरक्षिततेची भावना निर्माण झाली   . शेतीच्या शोधानंतर माणसांची कामे वाढली. ही सगळी कामे एकच व्यक्ती करू शकत नव्हती.म्हणून लोकांमध्ये कामाची वाटणी झाली.उदा.लाकडी अवजारे तयार करणे , त्याची दुरुस्ती करणे , कापड विणणे , दागिने बनवणे , मातीची भांडी तयार करणे असे विविध व्यवसाय करणारे कारागीर निर्माण झाले. शेती करण्यासाठी कोणकोणती अवजारे लागतात ? शेतीची जुनी अवजारे व आधुनिक अवजारे यांची माहिती मिळवा. कृषी प्रदर्शनाला भेट द्या. सांगा पाहू तुमच्या गावात कोणकोणत्या ऐतिहासिक वास्तू आहेत?

१२. आपली अन्नाची गरज

सांगा पाहू ० आजारपणात ही मुलगी खूप अशक्त झाली होती. काही दिवसांनी ती बरी झाली , त्यानंतर ती कशामुळे सुधारली ? सांगा पाहू ० बाळाची उंची आणि वजन यात वाढ कशामुळे झाली ? आपल्याला भूक का लागते ? आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायला हवे. त्यासाठी आपल्याला अन्नाची गरज असते अन्नामुळे आपल्या शरीराची वाढ होते. शरीराची होणारी झीज भरून येते. अन्नामुळेच काम करण्याची शक्ती मिळते. पुरेसे अन्न मिळाले नाही तर मरगळ येते. उत्साह वाटत नाही. अशा वेळी खूप भूक लागते आणि थोडे खाल्ले म्हणजे लगेच बरे वाटते. जेव्हा आपण जास्त काम करतो , तेव्हा आपले शरीर खूप ठाकते. आपल्याला जास्त भूक लागते. आपल्याप्रमाणे सर्व सजीवांना अन्नाची गरज असते. सांगा पाहू ० सर्व सजीव एकाच प्रकारचे अन्न खात असतील का ? ० गाय गवत खाते. म्हणून मांजरही गवत खाईल का ? ० मांजराला उंदीर खायला आवडतात. म्हणून शेळीला उंदीर खायला आवडतील का? ० सजीवांचे अन्न वेगवेगळे ० नवा शब्द शिका ! पेंड : तीळ , शेंगदाणे , सरकी अशा बियापासून तेल काढून झाल्यावर उरलेला चोथा. काही ठिकाणी याला ढेप असेही म्ह

१. आपल्या अवतीभोवती

आपल्या अवतीभोवती आपल्या अवतीभोवती या सर्व वस्तू तुम्हाला नक्की ओळखता येतील. त्या कोणत्या पदार्थापासून बनल्या आहेत. ते पदार्थ कोठे सापडतात ? या वस्तूंचे उपयोग सांगा. या वस्तूही तुम्हाला ओळखता येतील. या कोठे मिळतात ? या वस्तूंचा उपयोग सांगा. अवतीभोवती नजर टाकू. आपल्या आजूबाजूला अनेक वस्तू आहेत.त्या सर्वांचा मिळून आपला परिसर बनतो.त्यात माती दगड , धोंडे आहेत. नद्या नाले ताली आहेत.हवा आहे.डोंगर आणि टेकड्या आहेत.जंगले आहेत.शेते , घरे आणि रस्तेही आहेत.उजाड माळराने आहेत.वेगवेगळे प्राणी आपल्या सभोवताली असतात.निरनिराळ्या प्रकारचे वृक्ष , झाडेझुडपे , वेली यांनी आपला परिसर सजला आहे.आपणही या परिसराचा एक भागच आहोत. चिमणी आणि रस्त्यात पडलेला दगड. आता आपण आपल्या परिसरातील एक दगड आणी एक चिमणी यांची तुलना करू. दगड दगड जिथे आहे तिथेच पडून राहील.त्याला कोणी उचलून हलवले तरच त्याची जागा बदलेल.दगड जेवत नाही.त्यामुळे दगडाची वाढच होत नाही.दगडाला पिल्लेही होत नाहीत. चिमणी